भारतीय संविधानातली ताकत आज अमेरीके कडेही नाही Salute to Dr.B.R.Ambedkar ज्यांनी भारत हे "संघराज्य" म्हणुन स्थापन केले
भारताचे पंतप्रधान २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करू शकतात. अमेरिकेत ट्रम्प मात्र ते करुच शकत नाहीत. ३4 कोटींच्या
अमेरिकेत 5,00,000 रुग्ण आहेत. 16,000 मृत्यू झाले आहेत. एका दिवसात 2100 लोक कोरोनामुळे गेले. तो देश भयभीत झाला आहे. तरीही ट्रम्प तिथे "लॉकडाऊन" जाहीर करु शकत नाहीत.
आपल्या येथे मात्र देशभर लॉकडाऊन जाहीर करता येतो आणि अवघ्या देशात काही तासात शुकशुकाट होतो.जगाला आश्चर्य वाटत राहाते.यात *मोदी वा ट्रम्प हा मुद्दा नाही. मुद्दा आहे तो, भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाचा.
हे मी म्हणत नाही. अमेरिकेतील थोर संपादक, अभ्यासक फरीद झकारिया व जगातील इतर संविधान विश्लेषक तज्ञ म्हणताहेत.
आपल्या येथे मात्र देशभर लॉकडाऊन जाहीर करता येतो आणि अवघ्या देशात काही तासात शुकशुकाट होतो.जगाला आश्चर्य वाटत राहाते.यात *मोदी वा ट्रम्प हा मुद्दा नाही. मुद्दा आहे तो, भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाचा.
हे मी म्हणत नाही. अमेरिकेतील थोर संपादक, अभ्यासक फरीद झकारिया व जगातील इतर संविधान विश्लेषक तज्ञ म्हणताहेत.
"India could impose lockdown, Trump doesn't have that power."
अशी मांडणी करत फरीद म्हणतात,भारताच्या राज्यघटनेमुळे जी शक्ति केंद्राकडे आहे ती शक्ती अमेरिकेच्या अध्यक्षांकडे नाही.' भारतात 'फेडरल' व्यवस्था असली, तरी भारत हे 'युनियन' आहे. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष अशा वेळी उपस्थितही होत नाही.
अशी मांडणी करत फरीद म्हणतात,भारताच्या राज्यघटनेमुळे जी शक्ति केंद्राकडे आहे ती शक्ती अमेरिकेच्या अध्यक्षांकडे नाही.' भारतात 'फेडरल' व्यवस्था असली, तरी भारत हे 'युनियन' आहे. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष अशा वेळी उपस्थितही होत नाही.
अमेरिकेत ५० राज्ये आहेत. देशासोबत प्रत्येक राज्याचे नागरिकत्व वेगळे. राज्ये त्या अर्थाने स्वायत्त आहेत.अमेरीकेत नागरीकांना दुहेरी नागरीकत्व आहे, एक देशाचे व एक राज्याचे. त्यामुळे अमेरीकन अध्यक्षांना राज्यांना डावलून, या स्वरूपाचे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हीच खरी आपल्या राज्यघटनेची व संविधानाची किमया आहे.
loading...
डॉ आंबेडकरांनी हेतूतः 'युनियन' म्हणजे 'संघराज्य' हा शब्द राज्यघटनेत वापरला. अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स. तिथे राज्ये एकत्र येऊन देश स्थापन झाला.भारतात, आधी देश आकाराला आला आणि मग प्रांतरचना झाली. "नेशन फर्स्ट" ही राज्यघटनेतील तरतूद संघराज्य मजबुत करते आणि म्हणून, ही संविधानिक शक्ती आपल्या लोकशाहीतुन पंतप्रधानांना मिळते. डॉ.आंबेडकरांनी अनेक देशांच्या संवीधानांचा अभ्यास केला आणि अखेरीस या देशासाठी असे संवीधान लीहीले ज्यामुळे आजही आपला देश जगासमोर एक आश्चर्य बनुन उभा आहे की येथे एवढ्या जाती,धर्म, भाषा व ऊत्सवांची विवीधता असतांना देखील भारतदेश आजही अखंड देश म्हणुन खंबीरपणे उभा आहेइतक्या लहानसहान अत्यंत महत्वाच्या गोष्टींचा विचार केला होता डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांनी! म्हणून, भारत अतुट आणि महान आहे.
----------------
डॉ बी.आर.आंबेडकर जगातील सर्वश्रेष्ठ, दूरदृष्टी असलेले सच्चे देशभक्त व राष्ट्रवादी व्यक्तिमत्व होते हे यावरून पुन्ह:श्च सिद्ध होते
डॉ बी.आर.आंबेडकर जगातील सर्वश्रेष्ठ, दूरदृष्टी असलेले सच्चे देशभक्त व राष्ट्रवादी व्यक्तिमत्व होते हे यावरून पुन्ह:श्च सिद्ध होते
loading...
भारतीय संविधानातली ताकत आज अमेरीके कडेही नाही Salute to Dr.B.R.Ambedkar ज्यांनी भारत हे "संघराज्य" म्हणुन स्थापन केले
Reviewed by Raj morey
on
April 24, 2020
Rating:

No comments: